अबोल प्रेमाची बोलकी गोष्ट 😊
काय रे अभिषेक अजून किती वेळ लावणार आहेस तू? लवकर ये ना आता. केव्हा पासून वाट बघतेय मी? तरी मी म्हणतच होते की गोव्याला तु एकटाच जाऊन ये. तु तुझ्या कामात व्यस्त असतो आणि इथे हॉटेल मध्ये एकटं राहून मला कंटाळा येतो. आता लगेच ये. सवानी ने हसतच फोन ठेवला. सवानी आणि अभिषेक हे तसे बालपणाचे मित्र. लहानपणापासून ते सातत्याने सोबतच राहायचे. दोघेही तसे अबोल, शांत, मृदु स्वभावी, निर्व्यसनी आणि जिवाला जीव लावणारे. बालपण मागे पडत गेल आणि तरूणाई चे दिवस उजाडले. सवानी च्या वडिलांनी स्थळ शोधण्यास सुरुवात केली. पण तिला समजवून घेणारा, तिच्याशी न बोलता सुध्दा संवाद साधणार जोड़ीदार सापडेना. वर्ष उलटून गेलं. एका संध्याकाळी अभिषेक च्या आई ने सवानी ला घरी बोलावून घेतल. अभिषेक सुद्धा तिथे बसला होता. चहा झाला आणि डोळ्याची पापणी न हलवता अभिषेक च्या आई ने सवानी ला एक प्रश्न विचारला. अभिषेक सोबत लग्न करणार? सवानी ने अभिषेक कडे बघितलं. अभिषेक ने एक सौम्य हास्य दिलं आणि होकाराने मान डोलावली. सवानी करता इतकंच पर्याप्त होत. तिने अभिषेक च्या आईला लाजत होकार दिला. पुढल्या ६ महिन्यात थाटामाटात लग्न सुद्धा झालं. अभिषेक ...